मुंबई – राज्यातील करोनाबाधितांची संख्या आटोक्यात येत नसल्यामुळे कडक लॉकडाऊनची घोषणा राज्याचे मुख्य सचिव सीताराम कुंटे यांनी बुधवारी रात्री केली. सामान्य नागरिकांना अत्यावश्यक कारणाशिवाय घराबाहेर पडण्यास मनाई करण्यात आली असून शासकीय आणि अत्यावश्यक सेवेतील खासगी कार्यालये 15 टक्के उपस्थितीत सुरू ठेवता येणार आहेत. त्यामुळे घराबाहेर पडण्यावर सामान्य नागरिकांवर निर्बंध आले आहेत.
लग्न समारंभ हा २५ माणसांना घेऊन फक्त २ तासात उरकायचा आहे…
लग्न म्हणजे काय भातुकलीचा खेळ वाटला का???
२५ जणांपर्यंत ठीक होतं पण दोन तासात कसं शक्य आहे????
भावनांचा खेळ मांडला का????— Adv. Bhakti Jogal (@BhaktiJogal) April 21, 2021
अत्यावश्यक कारणाशिवाय जिल्ह्याबाहेर प्रवास करण्यास मनाई घालण्यात आली आहे. लोकल, मेट्रो, मोनोरेलने केवळ अत्यावश्यक सेवेतील लोकांनाच प्रवास करता येईल. सामान्य नागरिकांना या वाहनांचा वापर करता येणार नाही. विवाह सोहळ्यासाठी दोन तासांची परवानगी आणि 25 जणांच्या उपस्थितीला मान्यता दिली आहे. असे या आदेशात म्हटले आहे.
‘नवरी मुलीला स्टेज वर घेऊन या’ एवढचं म्हणण्यात तासभर घालवणारा भटजी दोन तासात लग्न उरकावे लागणार म्हणून खुश झाला असेल.
— Nikhil Bhosale (@nikhill_bhosale) April 21, 2021
राज्य सरकारने लागू केलेल्या नव्या नियमावलीमध्ये लग्नसमारंभासाठी यापूर्वी 50 लोकांना उपस्थित राहण्याची मुभा देण्यात आली होती. परंतु, सुधारित आदेशानंतर आता फक्त 25 लोकांच्या उपस्थितीत लग्न सोहळा पार पाडावा लागणार असून फक्त दोनच तास वेळ लग्नासाठी देण्यात आला आहे. मात्र या नियमांपैकी लग्नांसंदर्भातील नियम सध्या सोशल मिडियावर चर्चेचा विषय ठरत आहे. नेटकऱ्यांकडून मुख्यमंत्र्याना प्रश्न विचारले जात आहे. ट्विटरवर सध्या यावरून नेटकरी मविआ सरकारला ट्रोल करीत आहे
२ तासात तूम्ही तूमच्या पोराच तरी लग्न लावू दाखवा या निर्णया मुळे तूम्ही घरो घरी भांडण लावल आहे माझ्या घरात पण कळत नाही काय करायच २ तासात जर माझ्या घरात कोणाला काही झाल तर तूम्ही जबाबदार असाल लक्षात ठेवा
— Swapnil (@Swapnil92167362) April 21, 2021