नवी दिल्ली – असंख्य भारतीयांचे श्रध्दास्थान असलेले अयोध्येतील प्रभू श्रीरामाच्या मंदिरावर हल्ला करण्याचा कट दहशतवाद्यांनी आखला असल्याची माहिती गुप्तचर विभागातील सूत्रांच्या हवाल्याने देण्यात आली आहे. पाकिस्तानी दहशतवादी संघटनेने हा कट रचला असल्याचे सांगण्यात आले.
जैश ए मोहम्मद आणि लष्कर ए तोयाबा या संघटनेने या हल्ल्याची तयारी केली असल्याची माहिती समोर आली आहे. नेपाळमार्गे भारतात घुसखोरी करून हल्ला करण्याची योजना आखली गेली आहे. हिंदू आणि मुस्लिम या दोन समुदायांत तेढ निर्माण करण्याचे दहशतवाद्यांचे यामागे मनसुबे असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे.