त्रिनिदाद :- भारत व यजमान वेस्ट इंडीज यांच्यातील दुसरा कसोटी सामना संततधार पावसामुळे अनिर्णित अवस्थेत संपला. सामन्याच्या पाचव्या व अखेरच्या दिवशी एकाही चेंडूचा खेळ होऊ शकला नाही. या दोन सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना जिंकल्याने भारतीय संघाने ही मालिका 1-0 अशी खिशात टाकली.
दुसऱ्या कसोटीत भारताने पहिल्या डावात 438 धावा करत वेस्ट इंडीजचा पहिला डाव 255 धावांवर संपवला होता व 181 धावांची मोठी आघाडी घेतली होती. त्यानंतर भारताने आपला दुसरा डाव 2 बाद 181 धावांवर घोषित केला व वेस्ट इंडीजसमोर विजयासाठी 365 धावांचे आव्हान ठेवले.
चौथ्या दिवसाचा खेळ थांबाल होता तेव्हा वेस्ट इंडीजच्या दुसऱ्या डावात 2 बाद 76 धावा झाल्या होत्या. त्यानंतर पाचव्या दिवशी सकाळपासूनच संततधार पावसाला प्रारंभ झाला व पहिली दोन्ही सत्रे पावसामुळे खेळ होऊ शकला नाही.
त्यानंतर मैदान ओले व निसरडे राहिल्याने तसेच पाऊसही येत राहिल्याने पंचांनी अखेर खेळ होणार नसल्याचे जाहीर केले. या सामन्यात पहिल्या डावात वेस्ट इंडीजचे पाच गडी बाद करणारा भारताचा वेगवान गोलंदाज महंमद सिराज सामन्याचा मानकरी ठरला.
तर दोन्ही कसोटी धडाकेबाज फलंदाज करणारा भारताचा यशस्वी जयस्वाल मालिकेचा मानकरी ठरला. रवीचंद्रन अश्विनलाही सामन्याचा संयुक्त मानकरी म्हणून घोषित करण्यात आले. भारताचा कर्णधार रोहित शर्माने विजेतेपदाचा करंडक उंचावला.
संक्षिप्त धावफलक :-
भारत पहिला डाव – सर्वबाद 438 धावा. वेस्ट इंडीज पहिला डाव – सर्वबाद 255 धावा. भारत दुसरा डाव – 2 बाद 181 धावा घोषित. वेस्ट इंडीज दुसरा डाव – 32 षटकांत 2 बाद 76 धावा. (क्रेग बर्थव्हाइट 28, तेगनरेन चंदरपॉल नाबाद 24, जेरेमी ब्लॅकवूड नाबाद 20, रवीचंद्रन अश्विन 2-33).