कामशेत, (वार्ताहर) – ताजे ग्रुप ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी तायडाबाई हिरामण केदारी यांची बिनविरोध निवड झाली. मावळत्या सरपंचांनी राजीनामा दिल्याने रिक्त झालेल्या जागेसाठी ही निवडणूक घेण्यात आली.
निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली ग्रामपंचायत कार्यालयात झालेल्या विशेष बैठकीत निवडणूक घेण्यात आली. त्यात तायडाबाई केदारी यांची बिनविरोध निवड झाली.
या निवडणुकीत तायडाबाई केदारी यांचा एकमेव अर्ज प्राप्त झाल्याने निवडणूक आधिकारी आशा धायगुडे यांनी केदारी यांची बिनविरोध निवड झाल्याचे घोषित केले. निवडीनंतर भंडारा व गुलालाची उधळण करत संपूर्ण गावातून ढोल –
ताशाची मिरवणूक काढण्यात आली. ग्रामपंचायतीच्या माध्यमातून गावातील पायाभूत सुविधांचा विकास करण्यासाठी सदैव कटीबद्ध राहणार असल्याचे नवनिर्वाचित सरपंच तायडाबाई केदारी यांनी सांगितले. या वेळी सहदेव केदारी, सोमनाथ चोपडे आदी उपस्थित होते.