मुंबई – छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिका ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ने आजपर्यंत प्रेक्षकांची चांगलीच मने जिंकली आहे. गेल्या १४ वर्षांपासून ही मालिका प्रेक्षकांचे अहोरात्र मनोरंजन करत आहे. प्रेक्षकांना देखील या मालिकेतील सगळ्याच व्यक्तिरेखा प्रचंड आवडतात. जेठालाल, टप्पूसेना, डॉ. हाथी, पोपटलाल आणि मराठमोळा एकमेव सेक्रेटरी भिडे हे सर्वच पात्र रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवत आहे.
दरम्यान, नुकतंच प्रदर्शित झालेल्या मालिकेच्या एका एपिसोडमुळे तारक मेहताच्या संपूर्ण टीमला प्रेक्षकांची माफी मागावी लागली आहे. या घटने मुळे सर्व टीमला सोशल मीडियावर ट्रोल देखील करण्यात आलं होत. भारताच्या गानसम्राज्ञी ‘लता मंगेशकर’ यांच्याबाबत मेकर्सनी ही चूक केली होती.
सोमवारी प्रसारित झालेल्या एपिसोडमध्ये गोकुळधाममधील सर्व सदस्य सोसायटी क्लबमध्ये एकत्र जमलेले दिसत आहेत. याठिकाणी जुन्या काळातील गाणी लावून त्यावर चर्चा करत होते. अशात लता मंगेशकर यांचं ‘ए मेरे वतन के लोगों’ हे गाणं सुरु होतं.
View this post on Instagram
त्यानंतर यावर बोलताना मिस्टर भिडे म्हणाले की, हे गाणं १९६५ मध्ये प्रदर्शित झालं होतं आणि त्यावेळी तत्कालीन पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांनी लता मंगेशकर यांचं हे गाणं ऐकलं तेव्हा त्यांच्याही डोळयात पाणी आलं होतं.
मात्र, आपल्या या चुकीसाठी असित मोदी आणि तारक मेहताची संपूर्ण टीम यांनी प्रेक्षकांची माफी मागितली आहे. या संदर्भातील एक पोस्ट सुद्धा असित मोदी यांनी सोशल मीडियावर शेअर केली आहे. त्यांनी लिहिलं… ‘आम्ही आमचे शुभचिंतक, चाहते आणि प्रेक्षक यांची माफी मागू इच्छितो.
आजच्या एपिसोडमध्ये आम्ही ‘ए मेरे वतन के लोगों’ गाण्याच्या प्रदर्शनाची तारीख १९६५ असल्याचं म्हटलं होतं. पण हे गाणं २६ जानेवारी १९६३ मध्ये प्रदर्शित झालं होतं. आम्ही आमची चूक मान्य करतो आणि पुन्हा अशी चूक होणार नाही याची काळजी घेऊ- तुमचा असित मोदी आणि तारक मेहताची संपूर्ण टीम’.