Gujarat Lok sabha election: सुरत लोकसभा मतदारसंघातून भाजपचे मिशन 400 खाते उघडले आहे. मतदानापूर्वीच येथे भाजपचे मुकेश दलाल विजयी झाले आहेत. वास्तविक, येथील काँग्रेसच्या उमेदवाराचा अर्ज रद्द करण्यात आला आहे. त्याचवेळी या जागेसाठी अर्ज दाखल केलेल्या उर्वरित 8 उमेदवारांनी अर्ज मागे घेतला. अशा स्थितीत भाजपचे मुकेश दलाल यांनी बिनविरोध निवडणूक जिंकली आहे.
First Victory for BJP 🪷
First Lok Sabha seat from Surat won by BJP candidate Mukesh Dalal.
Congress candidate Nilesh Khumbhani’s proposers backed out and his nomination got rejected.
Rest 8 independent candidates withdraw their nominations.
Mukesh Dalal won without voting. pic.twitter.com/8p8XApXsoi
— Sunanda Roy 👑 (@SaffronSunanda) April 22, 2024
बसपाच्या उमेदवाराने सोमवारी अर्ज मागे घेतला –
सुरत लोकसभा मतदारसंघातून एकूण 9 उमेदवारांनी अर्ज दाखल केले होते. नुकताच येथून काँग्रेसचे उमेदवार नीलेश कुंभानी यांचा अर्ज रद्द करण्यात आला. यानंतर एकामागून एक सहा उमेदवारांनी या जागेवरून आपले अर्ज मागे घेतले. फक्त बसपचे उमेदवार प्यारेलाल अर्ज मागे घेण्याचे राहिले होते. त्यांनी सोमवारी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला. आज सकाळी प्यारेलाल सुरत जिल्हा प्रशासन कार्यालयात पोहोचले आणि त्यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला. त्यानंतर भाजपचे उमेदवार मुकेश दलाल यांनी येथून बिनविरोध निवडणूक जिंकली आहे.
VIDEO | Surat District Collector gives Member of Parliament (MP) certificate to BJP’s Mukesh Dalal, who was elected unopposed from Surat Lok Sabha seat after all other candidates withdrew from the fray. #LSPolls2024WithPTI #LokSabhaElections2024 pic.twitter.com/0raJgl8RGu
— Press Trust of India (@PTI_News) April 22, 2024
हाय व्होल्टेज ड्रामा –
भाजपचे उमेदवार मुकेश दलाल बिनविरोध निवडून येण्यापूर्वी या जागेवर हाय व्होल्टेज ड्रामा रंगला. काँग्रेसचे उमेदवार नीलेश कुंभानी यांच्या फॉर्मवर भाजप उमेदवाराचे निवडणूक प्रतिनिधी दिनेश जोधानी यांनी आक्षेप घेतला होता. उमेदवाराला कोणीही प्रस्तावक नसल्याचा दावा त्यांनी केला. रविवारी निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांनी या प्रकरणाची सुनावणी करत काँग्रेस उमेदवाराचे अर्ज रद्द केले. त्याचवेळी या जागेवरून एकापाठोपाठ एक उमेदवार अर्ज मागे घेत असताना बसपचे उमेदवार प्यारेलाल यांनी पोलिस संरक्षणाची मागणी केली होती. बसपाच्या उमेदवाराला नाव मागे घेण्यासाठी काही लोक आमिष दाखवत असल्याचा आरोप करण्यात आला. मात्र अखेर प्यारेलाल यांनी अर्ज मागे घेतला आणि भाजप उमेदवार मतदानापूर्वीच बिनविरोध निवडून आले.
हुकूमशहाचा खरा ‘चेहरा’ पुन्हा एकदा देशासमोर आला – राहुल गांधी
दरम्यान, यावर राहुल गांधी यांनी प्रतिक्रिया दिली आहे, ते म्हणाले की, ‘हुकूमशहाचा खरा ‘चेहरा’ पुन्हा एकदा देशासमोर आला आहे. जनतेचा नेता निवडण्याचा अधिकार काढून घेणे हे बाबासाहेब आंबेडकरांचे संविधान नष्ट करण्याच्या दिशेने आणखी एक पाऊल आहे. मी पुन्हा एकदा सांगतो – ही केवळ सरकार स्थापनेची निवडणूक नाही, ती देश वाचवण्याची निवडणूक आहे, संविधानाच्या रक्षणाची निवडणूक आहे.’
तानाशाह की असली ‘सूरत’ एक बार फिर देश के सामने है!
जनता से अपना नेता चुनने का अधिकार छीन लेना बाबा साहेब अंबेडकर के संविधान को खत्म करने की तरफ बढ़ाया एक और कदम है।
मैं एक बार फिर कह रहा हूं – यह सिर्फ सरकार बनाने का चुनाव नहीं है, यह देश को बचाने का चुनाव है, संविधान की…
— Rahul Gandhi (@RahulGandhi) April 22, 2024