नवी दिल्ली – केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी सोमवारी संसदेत काश्मीरच्या विषयावर निवेदन करताना जम्मू-काश्मीरमधून कलम 370 हटवण्याची शिफारस मांडली. तसेच जम्मू काश्मीर राज्याचे विभाजन करून तो केंद्र शासित प्रदेश म्हणून उदयास येणार आहे.
मात्र, सरकारच्या या निर्णया विरोधात शाह फैसल यांच्या पक्षाशी निगडीत असलेल्या शेहला रशीद हिने आपण सर्वोच्च न्यायालयात दाद मागणार असल्याचे म्हटले आहे. यावेळी बोलताना त्या म्हणाल्या सरकारचा निर्णय म्हणजे संविधानाचा विश्वासघात आहे. दरम्यान, आम्ही बंगळुरू आणि दिल्लीत याविरोधात आंदोलन करणार असल्याचे रशीद हिने सांगितले.