सोमेश्वरनगर : आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत साखरेचे उत्पादन जादा झालेले आहे, आरोग्यामुळे साखर खाण्याच्या कल कमी झालेला आहे, पाऊस असलेल्या भागात ऊस लागवडी वाढत आहेत, अशावेळी शासकीय मदतीची वाट न पाहता साखर कारखान्यानी आपापल्या पायावर उभे राहण्याची गरज असल्याचे मत महाराष्ट्र राज्य साखर संघाचे अध्यक्ष जयप्रकाश दांडेकर यांनी व्यक्त केले.
सोमेश्वरनगर ता बारामती येथे सोमेश्वर सहकरीं कारखाना आणि महाराष्ट्र साखर संघ यांच्या संयुक्त विद्यमाने, पुणे आणि सातारा या जिल्हातील सहकारी साखर कारखाना चेअरमन आणि कार्यकारी संचालक यांच्या एक दिवससीय चर्चा सत्राचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाराष्ट्र राज्य सहकारी साखर संघाचे जयप्रकाश दांडेकर होते. यावेळी सोमेश्वर करखण्याचे अध्यक्ष पुरुषोत्तम जगताप, महाराष्ट्र साखर संघाचे उपाध्यक्ष श्रीरंग शेटे कार्यकारी संचालक संजय खताळ, छत्रपती करखण्याचे अध्यक्ष प्रशांत काटे, माळेगाव करखनाचे अध्यक्ष रंजन तावरे, सोमेश्वर चे उपाध्यक्ष शैलेश रारकर ,सर्व करखण्याचे चेअरमन, सदस्य व कार्यकारी संचालक आदी उपस्थित होते.
दांडेकर पुढे म्हणाले, साखरेचा उठाव वर्ष दीड वर्ष होत नाही, राज्य बँकेला पोत्याचे व्याज भरावे लागत आहे, यासाठी कारखान्यांनी इथेनॉलकडे वळणे गरजेचे असल्याचे सांगून मागील चार वर्षात दुष्काळ, साखरेची न होणारी उचल यामुळे शंभर सहकारी साखर कारखान्यांपैकी सत्तर साखर करखान्यांपुढे अनेक अडचणी आहेत.
गेल्या १० वर्षात सरकारचे कएखान्यांना सहकार्य नाही, सहकार ही गरीब शेतकऱ्यांची चळवळ आहे, काही वर्तमानपत्रे गेल्या १०-१५ वर्षात सहकाराचे नकारात्मक चित्र महाराष्ट्रापुढे मांडले जात आहे, सहकार म्हणजे भ्रष्टाचाराचे केंद्र, राजकारण चे अड्डे असे चित्र लोकांपुढे मांडले जात असल्याची खंत त्यांनी व्यक्त केली.