Ram Mandir – राम मंदिर आंदोलनाचा प्रमुख भाग असलेल्या उमा भारती आणि साध्वी ऋतंभरा आज भावूक झाल्या. रामललाच्या अभिषेक सोहळ्यासाठी अयोध्येत पोहोचलेल्या उमा भारती आणि साध्वी ऋतंभरा यांनी एकमेकांना मिठी मारली आणि यादरम्यान साध्वी ऋतंभरा यांच्या डोळ्यात अश्रू दिसले.
यावेळी त्या म्हणाल्या की, आज माझ्याकडे शब्द नाहीत… भावना सर्व काही सांगत आहेत. परम शक्तीपीठ आणि वात्सल्यग्रामच्या संस्थापिका साध्वी ऋतंभरा म्हणाल्या, “प्राण प्रतिष्ठेचा हा आनंदाचा अपूर्व असा क्षण आहे, संपूर्ण देश आणि संपूर्ण जग सजले आहे… कर सेवकांचे बलिदान सार्थक झाले आहे… राम लल्ला आले आहेत.
उमा भारती यांनीही सांगितले की, ज्या प्रेरणेने आणि उत्साहाने आम्ही रथयात्रेमध्ये सहभागी झालो होतो, त्याचे वास्तव फलस्वरुप पाहण्याचा आनंद हा कधीही शब्दांत मांडता येणारा नाही. आम्ही कृतकृत्य झालो आहोत. 6 डिसेंबर 1992 रोजी लाखो कारसेवक अयोध्येला पोहोचले होते, तेव्हा साध्वी ऋतंभरा आणि उमा भारती याही कारसेवकांच्या गर्दीचे नेतृत्व करणाऱ्यांमध्ये होत्या.