Manoj Jarange Patil – मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांच्या समवेत लाखोंच्या संख्येने मराठा समाज बांधव मराठा आरक्षणाची मागणी घेऊन मुंबईच्या दिशेने रवाना झाले आहेत. अंतरवाली सराटी येथून शनिवारी या यात्रेचा प्रारंभ झाला असून, आज पुण्यात पोहोचणार आहे. मात्र, त्यापूर्वी अहमदनगर शहरातील भिंगार भागातील श्रीराम मंदिरात मनोज जरांगे पाटील यांच्या हस्ते आरती करण्यात आली.
यावेळी या परिसरातील नागरिकांनी देखील आरतीसाठी हजेरी लावली. आरती संपल्यानंतर जरांगे पाटील यांच्या मंदिर संस्थानच्या वतीनं सत्कार देखील करण्यात आला. सध्या देशाचे अयोध्येत होत असलेल्या राम मंदिरातील प्राणप्रतिष्ठा सोहळ्याकडे लक्ष लागलं आहे. या विषयी त्यांना प्रश्न विचारला असता ते म्हणाले,
आरक्षण मिळाल्यानंतर रेल्वे भरून अयोध्येला दर्शनासाठी जाणार असल्याची प्रतिक्रिया जरांगे पाटलांनी यावेळी दिली. तसेच आरक्षण मिळेपर्यंत मराठा समाजाता हा लढा असाच चालू राहील. आता ही आरपारची लढाई असल्याचे मनोज जरांगे पाटील यांनी म्हटलं आहे.
सकल मराठाच्या डॉक्टरांची टीम सज्ज
आंतरावली सराटीवरून निघालेल्या मनोज जरांगे पाटील यांच्या मोर्चाचे रविवारी सायंकाळी उशीरा नगरजवळील बाराबाभळी याठिकाणी आगमन झाले. यावेळी मोर्चात सहभागी लोकांच्या आरोग्याच्या तपासणीसाठी नगरच्या सकल मराठा समाजाच्यावतीन डॉक्टरांची टीम सज्ज होती. या टीममध्ये जवळपास 150 डॉक्टरांची उपस्थिती होती.