केतकावळे -पुरंदरच्या पश्चिम भागात गुरुवार (दि.25) दुपारी विजेच्या कडकडाट व हलक्या वाऱ्यासह पावसाने साधारण अर्धा तास ते एक तास अशी दमदार हजेरी लावली आहे. बऱ्याच दिवसांच्या विश्रांतीनंतर केतकावळे, गराडे, भिवरी, बोपगाव, चांबळी, हिवरे, कोडीत, नारायणपूर, भिवडी, सुपे खुर्द आदी भागात दमदार हजेरी लावली.
पेरणी केलेल्या शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. दोन दिवसात कऱ्हा नदीला पाणी येईल, अशी माहिती जिल्हा परिषदेचे माजी सदस्य गंगाराम जगदाळे यांनी दिली. माजी सरपंच बाळासो साबळे, माजी सरपंच रामभाऊ बोरकर, विजय फरतडे, अशोक टिळेकर, संतोष बाठे, अशोक दळवी, अलका बडदे, दशरथ लवांडे, शिवाजी फरतडे, हरिभाऊ लोळे, सुनीता पवार, मनोज कुंजीर, अंकुश खेडेकर, विकास पवार, हनुमंत साळुंखे यांनी लॉकडाऊनमध्ये पिचलेल्या शेतकऱ्यांना दिलासा मिळाल्याची प्रतिक्रिया दिली.