बेल्हे -जुन्नर तालुक्यातील पूर्व भागात जून महिन्याच्या पहिल्याच दिवशी पावसाने जोरदार हजेरी लावली. त्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.
राजुरी, बेल्हे, गुंजाळवाडी, गुळुंचवाडी, बांगरवाडी, पेमदरा, आणे तसेच पूर्व भागात रविवार (दि.31) मध्यरात्रीच्या सुमारास दमदार हजेरी लावली.
रविवारी सकाळपासून हयेत उकाडा जाणवत होता. ढगाळ वातावरण निर्माण झाले होते. कांदा काढून ठेवलेल्या शेतकऱ्यांनी कांदा झाकून ठेवला आहे.
काही प्रमाणात शेतकऱ्याच्या पिकांचे नुकसान झाले आहे. तरी हा पाऊस खरीप हंगामाच्या कामासाठी दिलासादायक असल्यामुळे शेतकरी सुखावले आहेत. यावर्षी जूनच्या सुरुवातीलाच पावसाने हजेरी लावल्यामुळे खरीप हंगामाच्या आशा पल्लवित झाल्या आहेत.