सोलापूर – उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) हे आपल्या सडेतोड वक्तव्यांसाठी ओळखले जातात. मग कधी ते कार्यकर्त्याला टोमणा मारतात तर कधी भर सभेत खडेबोल सुनावतात. सोलापुरातील सभेत (Solapur) देखील असाच काहीसा प्रकार पाहायला मिळाला. यावेळी बोलताना लोकसंख्या वाढीवरून अजित पवारांनी मिश्किल टिप्पण्णी केली. दिवसेन् दिवस पिढी वाढते तसं शेतीत तुकडे पडतात. त्यामुळे शेतकरी अल्पभूधारक होतो. कुणी थांबायलाच तयार नाही. असं अजित पवार (ncp) यावेळी बोलताना म्हणाले.
लोकसंख्या वाढीबाबत बोलताना अजित पवार पुढे म्हणाले,”स्वातंत्र्य मिळालं तेव्हा आपण 35 कोटी होतो.आता 140 कोटी आहोत.चौपट लोकसंख्या वाढली. आपण एकदोन आपत्त्यावर थांबलं पाहिजे. सर्व समाजाने दोन मुलावर थांबलं पाहिजे. कोणत्याही जाती धर्म, पंथात काही सांगितलेलं नाही. देवाची कृपा.. देवाची कृपा.. काही देवाची कृपा नसते, आपलीच कृपा असते” अशी मिश्किल टोलेबाजी यावेळी अजित पवारांनी (Ajit Pawar in solapur) केली.
आम्ही देखील वेगवेगळ्या समाजांच्या आरक्षणाच्या (Reservation) बाजूचेच आहोत. पण आमची भूमिका आता दिलेल्या समाजाच्या आरक्षणाला धक्का न लागता इतर समाजांना आरक्षण देण्याची आहे असं स्पष्ट मत देखील अजित पवार यांनी यावेळी व्यक्त केलं. तसेच हायकोर्टात आणि सर्वोच्च न्यायालयात आरक्षण टीकावं आणि सगळ्यांनी समाधानाने राहावं, जातीपातींमध्ये सलोखा राहावा अशी आमची भूमिका आहे, असेही पवार यावेळी बोलताना म्हणाले.
जनगणनेवरही केलं भाष्य
मी बिहार सरकारकेड त्यांनी कशा पद्धतीने जनगणना (census) केली याची माहिती मागितली आहे. त्यासाठी हजारो कोटी खर्च होतील, पण झाले तरी हरकत नाही. पण एकदा समाजासमोर स्पष्ट चित्र आलं पाहिजे, असे अजित पवार यांनी स्पष्ट केलं. सकल मराठा समाज मागणी करतोय ती पूर्णत्वाला नेत असताना इतरांच्या आरक्षणाला धक्का लागता कामा नये. त्यांच्या भावना दुखवल्या गेल्या नाही पाहीजेत, असेही अजित पवार (Ajit pawar) यावेळी म्हणाले.