मुंबई – शुक्रवारी आणि सोमवारी भारतीय शेअर बाजाराचे निर्देशांक मोठ्या प्रमाणात कोसळल्यामुळे दोन दिवसांमध्ये शेअर बाजारात गुंतवणूक करणाऱ्यांचे 6.57 लाख कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे.
या 2 दिवसात मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स 1,054 अंकांनी म्हणजे 2.52 टक्क्यांनी कोसळला आहे. त्यामुळे या दोन दिवसांमध्ये शेअर बाजारावर नोंदलेल्या कंपन्यांचे बाजार मूल्य 6.57 लाख कोटी रुपयांनी कमी होऊन 273 लाख कोटी रुपये झाले आहे.
विशेष म्हणजे गेल्याच आठवड्यात या कंपन्यांचे बाजार मूल्य विक्रमी पातळीवर गेले होते. मात्र शुक्रवारी आणि सोमवारी शेअर बाजारात मोठ्या प्रमाणात विक्री झाली. त्यामुळे कंपन्यांच्या बाजार मूल्याचा मोठ्या प्रमाणात घसारा झाला असल्याचे दिसून येते.