खालापूर – रायगड -मावळची जबाबदारी मी मागून घेतली आहे. या दोन्ही लोकसभा मतदार संघात व नऊ विधानसभेच्या मतदार संघात शिवसेनेचा भगवा फडकवणारच, असा दावा माजी मंत्री अनंत गीते यांनी केला. यावेळी शिवसेना नेते तथा माजी केंद्रिय मंत्री अनंत गीते, शिवसेना उपनेते नितीन बानगुडे-पाटील, किशोर जैन, बबन पाटील, माजी आमदार मनोहर भोइर, भाई शिंदे, नितीन सावंतआदी प्रमुखासह शिवसैनिक – युवासैनिक व महिला आघाडी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी बोलताना अनंत गीते म्हणाले की, हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे व शिवसेनेनेने माणसांना वाघाप्रमाणे जगण्यास शिकवले आहे. भाजप व त्यांच्या कळपात गेलेल्या गद्दारांनी लोकभावनेचा आदर ठेवलेला नाही. उद्धव ठाकरे हा एकच माणूस दिल्लीला हादर शक्यतो, हे पंतप्रधान नरेंद्र मोदी व अमित शहा यांच्या लक्षात आल्याने त्यांनी येनकेन प्रकारे उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री पदावरून पदव्युत्तर केले.
त्याचा बदला घेण्याची संधी आगामी विधानसभा व लोकसभा निवडणुका आहेत. आगामी सार्वत्रिक निवडणुकी नंतर राज्यात व देशात भाजप आणि गद्दार औषधालाही उरणार नाहीत हे उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून कामाला लागा.
उपनेते नितीन बानगुडे पाटील म्हणाले की, शिवसेना व शिवसैनिक कधी संपत नाही. अदानीच्या घशात धारावी व राज्यातील उद्योग गुजरातला पळविण्यासाठीच भाजपकडून उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री पदावरून हटविण्यात आले. ठाकरे मुख्यमंत्री असताना राज्यात 80 हजार कोटीचे उद्योग आणलेत. दुसरीकडे वर्तमान सरकारच्या काळात राज्यातील उद्योग गुजरातला पळविण्यात आले.