पुणे : वाढत्या नागरिकरणामुळे बाणेर-बालेवाडी, सुतारवाडी, म्हाळूंगे, बावधन, सूस भागात दिवसेंदिवस मोठया प्रमाणात गुन्हेगारी मोठया प्रमाणात वाढत होती. त्यामुळे या भागासाठी स्वतंत्र पोलीस ठाणे सुरू सुरू करण्याची मागणी करण्यात येत होती. अखेर राज्य शासानाने त्यासाठी मान्यता दिली असून स्थानिक नागरिक तसेच लोकप्रतिनिधींकडून या निर्णयाचे स्वागत करण्यात आले आहे.
गेल्या काही वर्षात बाणेर – बालेवाडी, पाषाण, सुतारवाडी, बावधन, सुस, म्हाळुंगे या परिसरात लोकसंख्या मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे. त्यामुळे गुन्हेगारी मोठया प्रमाणात वाढत असल्याचे दिसून येत आहे तसेच चोरी, भांडणे, मारामारी असे प्रकार वाढलेले आहेत. या भागासाठी सध्या चतृश्रृंगी पोलीस ठाण्याच्या हद्दीत येत होता.
मात्र, हा भाग खूप मोठा असल्याने तसेच त्या तुलनेत पोलिसांची संख्या कमी असल्याने या पोलीस ठाण्यावर कामाचा प्रचंड ताण येत होता. त्या, अनुषंगाने महाराष्ट्र राज्य सरकारने या सर्व बाबींचा विचार करून बाणेर या परिसराकरिता स्वतंत्र पोलिस स्टेशनला मान्यता दिल्याने नागरिकांकडून या निर्णयाचे स्वागत करण्यात येत आहे.
राज्य सरकारचे मनापासून स्वागत व आभार मानले आहे. सर्वसामान्य नागरिकांना या निर्णयाबद्दल खुप मोठे समाधान वाटत आहे. तसेच गुन्हेगारीला मोठ्याप्रमाणात आळा बसून नागरिकांमधील असलेले भीतीचे वातावरण निश्चितच कमी होईल अशी अपेक्षा आहे.
– बाबूराव चांदेरे ( माजी स्थायी समिती अध्यक्ष)