कोलंबो – श्रीलंकेतील परिस्थितीत भारताने सढळ हस्ते मदत केल्याबद्दल श्रीलंका क्रिकेट संघाचा माजी कर्णधार सनथ जयसूर्या याने आभार मानले आहेत. श्रीलंकेत सध्या महागाईने उच्चांक गाठला आहे, तसेच तेथे राजकीय व सामाजिक अस्थिरता निर्माण झाली आहे. अन्नधान्याचे दर गगनाला भिडले आहेत. पेट्रोल व कोळसा संपत आला असून देशाची परिस्थिती खूपच बिकट बनली आहे. त्याला हारभार म्हणून भारताने श्रीलंकेला सातत्याने मदत करण्याचे धोरण अवलंबीले आहे, त्याबद्दल जयसूर्याने भारत सरकारला धन्यवाद दिले आहेत.
जयसूर्याने म्हटले आहे की, सर्वांना शांततापूर्ण आंदोलन हवे आहे आणि आम्ही तेच करत आहोत. राष्ट्रपतींच्या राजीनाम्यासाठी मी पहिल्या दिवसापासून आंदोलकांसोबत होतो.
#WATCH| After a stable govt, IMF, India & all friendly countries will… help Sri Lanka. India, being very helpful from the start of crisis, has given aide. We are thankful. India is playing a big role for Sri Lanka: Former Sri Lankan cricketer Sanath Jayasuriya to ANI#SriLanka pic.twitter.com/gBuSdSJtAG
— ANI (@ANI) July 11, 2022
जयसूर्याने पुढे म्हटले आहे की… स्पीकर, ज्येष्ठ राजकारणी, पक्षाच्या नेत्यांनी त्वरित निर्णय घेण्याची गरज आहे. कायमस्वरूपी सरकार स्थापन झाल्यावर आंतरराष्ट्रीय नाणेनिधी, भारत आणि इतर भागीदार देश श्रीलंकेला मदत करतील. या संकटात सुरुवातीपासून भारताने खूप मदत केली आहे. याबद्दल आम्ही कृतज्ञ आहोत. श्रीलंकेसाठी भारत महत्त्वाची भूमिका बजावत आहे.