मुंबई – राष्ट्रपती निवडणुकीसंदर्भात पक्षाच्या भूमिकेबाबत चर्चा करण्यासाठी माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी खासदारांची बैठक बोलावली होती. काही खासदारांनी या बैठकीला अनुपस्थिती लावली होती. त्यामुळे आता खासदारही बंडखोरीच्या तयारीत असल्याची चर्चा रंगली होती. दरम्यान, बैठकीला उपस्थित असलेल्या काही खासदारांनी माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांना एनडीएच्या राष्ट्रपतीपदाच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू यांना पाठिंबा देण्याची विनंती केली होती. त्यानंतर राज्यात घडलेल्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर शिवसेना नेमकी कुणाला पाठिंबा देणार? यावरून तर्क-वितर्क लढवले जात होते.
माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी मंगळवारी शिवसेना भवनात पत्रकार परिषद घेतली. यात त्यांनी राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीवर आपली भूमिका स्पष्ट केली. उद्धव ठाकरे म्हणाले, “एक आदिवासी महिला देशाच्या सर्वोच्च पदी विराजमान होत असेल तर आपल्याला आनंद आहे. या आधी प्रतिभा पाटील यांना आणि त्यानंतर प्रणब मुखर्जी या यूपीएच्या उमेदवारांना शिवसेनेने एनडीएपेक्षा वेगळा निर्णय घेतला होता.
अग्निपथ योजनेच्या विरोधात दिल्ली उच्च न्यायालयात आव्हान याचिका
आताही शिवसेना तशीच वेगळी भूमिका घेत एनडीएच्या द्रौपदी मुर्मू यांना पाठिंबा जाहीर करत आहे. शिवसेनेच्या खासदारांची एक बैठक घेतली होती. त्यामध्ये खासदारांनी एनडीएच्या द्रौपदी मुर्मू यांना पाठिंबा जाहीर करावा, अशी विनंती केली होती. पण अखेरचा निर्णय हा आपल्यावरच सोपावला होता, अशी उद्धव ठाकरे यांनी माहिती दिली. त्यानंतर आदिवासी समाजातील शिवसैनिक आणि नेत्यांनी आपल्याला द्रौपदी मुर्मू यांना पाठिंबा जाहीर करावा, अशी विनंती केल्याचेही उद्धव ठाकरे म्हणाले.
दुर्दैवी! तीन भावंडांचा खड्ड्यात बुडून मृत्यू