मुंबई – मराठी चित्रपटातून आपली वेगळी छाप पाडणाऱ्या प्रसिद्ध अभिनेत्री ‘स्पृहा जोशी’ नेहमीच आपल्या कलागुणांमुळे प्रेक्षकांच्या मनावर राज्य करत असते. मराठी नाटक, मालिका आणि चित्रपट यामध्ये स्पृहाने साकारलेल्या विलक्षण भूमिका नेहमीच प्रेक्षकांच्या लक्षात राहिल्या आहे. ‘उंच माझा झोका’मध्ये रमाबाई रानडेंची स्पृहाने साकारलेली भूमिका प्रेक्षकांच्या विशेष लक्षात राहिली आहे.
स्पृहा सोशल मीडियावरही बरीच सक्रिय आहे. सोशल मीडियावर ती आपले फोटो आणि कविता तसंच विचार शेअर करत असते. तिचे फोटो तिच्या फॅन्सना प्रचंड आवडतात. अशात पुन्हा एकदा ती चर्चेत आली. नुकतीच स्पृहाने एक युट्यूब चॅनेलच्या मुलाखत दिली. या मुलाखतीत तिनेव्यावसायिक व वैयक्तिक आयुष्याबद्दल आपल स्पष्ट मतं मांडल.
युट्यूब चॅनेलच्या मुलाखतीत मुग्धा गोडबोले यांनी ‘अलीकडच्या अनेक अभिनेत्रींनी मूल होऊ न देण्याचा निर्णय घेतला आहे. आजची पिढी असा विचार का करते?” याबद्दल विचारलं. यावर स्पृहा म्हणाली,या सगळ्या गोष्टी फार वैयक्तिक असल्याने यात काय चूक काय बरोबर? याचा विचार करण्यात काहीच अर्थ नाही. माझ्या अशा अनेक मैत्रिणी आहेत ज्यांना मूल हवं होतं आणि बाळ झाल्यानंतरही आज त्यांचं करिअर अगदी उत्तम सुरु आहे. याचं सगळ्यात उत्तम उदाहरण घ्यायचं झालं, तर गिरीजा ओक, आरती यांनी बाळ झाल्यावर इंडस्ट्रीत पुन्हा एकदा काम करायला सुरुवात केली.’ सध्या तिच्या या भूमिकेवर चाहते प्रतिक्रिया देते कौतुक करत आहे.