नवी दिल्ली : नागरिकत्व कायद्याविरोधात काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधींनी मोदी सरकारवर टीका केली आहे. मोदी सरकार विभाजनाची जननी झाली आहे, असा आरोप सोनिया गांधी यांनी मोदी सरकारवर केला आहे. सरकारने देशाला अंधकारात ढकलून दिले असून, विद्यार्थ्यांच्या भविष्याला आग लावली आहे असल्याचा जोरदार हल्ला सरकारवर केला.
मोदी सरकार स्वयं हिंसा व बंटवारे की जननी बन गई है। सरकार ने देश को नफरत की अंधी खाई में धकेल दिया है तथा युवाओं के भविष्य को आग की भट्टी में झुलसा दिया है : कांग्रेस अध्यक्ष श्रीमती सोनिया गांधी#BJPBurningBharat pic.twitter.com/wqxijyEtQs
— Congress (@INCIndia) December 16, 2019
नागरिकत्व कायद्याच्या विरोधात संपूर्ण देश पेटला असून अनेक ठिकाणी हिंसाचार झाला आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यात ईशान्य भारताचा दौरा करण्याची हिंमत नाही, असे सोनिया गांधी म्हणाल्या. भाजप सरकारने देश आणि देशवासीयांवर हल्ला केला आहे. सरकारने जनतेचे रक्षण करणे गरजेचे आहे मात्र सरकार जाणीवपूर्वर देशात अस्थिरता निर्माण करीत असल्याची टीका त्यांनी केली.