समाजातील गोरगरिबांना मदतीचा हात देणे हीच ईश्वर सेवा असून समाजाची सेवा केल्यास मनाला एक प्रकारे आनंद व समाधान मिळते. हा आदर्श तरुणांना पुढे ठेवला आहे पारगाव (ता.आंबेगाव) येथील तरुण उद्योजक व ग्रामपंचायत सदस्य दत्ताराम रघुनाथ वैद यांनी दाखवून दिला आहे.
पारगाव येथील दत्ताराम वैद यांची घरची परिस्थिती अत्यंत हालाखीची लहानपणीच गरिबांचे चटके त्यांनी सोसलेले होते. परिस्थितीमुळे कुटुंबातील जबाबदारी पार पाडण्यासाठी इयत्ता सातवी मधून शाळा सोडावी लागली व गावात शेतमजूर करून कुटुंबाला हातभार लावावा लागला शेतमजूरी करताना आपल्या शेताचे सपाटीकरण करून शेतीला पाणी पुरवठा करून शेतात पिके घेऊ लागले. मिळालेल्या पैसामधुन त्यांनी आधुनिक पध्दतीने गायांचा गोठा बांधला व दुध व्यवसाय सुरु केला. त्यानंतर ट्रक विकत घेऊन भीमाशंकर साखर कारखान्यात ऊस वाहतूक सुरू केली.
दत्ताराम वैद यांना तरुणपणात समासेवेची आवड निर्माण झाली.वारकरी संप्रदयातील वारकऱ्यांना आळंदी व पंढरपूर यात्रेला घेऊन जाऊन स्वखर्चाने देवदर्शन घडवले. गावातील नागरिकांना पिण्याचे चांगले शुद्ध पाणी मिळत नसल्यामुळे नागरिक आजारी पडत होते. यासाठी त्यांनी आपल्या घराजवळच जलशुद्धीकरण प्रकल्प सुरू केला. व नागरिकांना पिण्याचे शुद्ध पाणी मिळू लागले. सार्वजनिक कार्यक्रमांना तसेच गेल्या पाच वर्षांपासून श्री. संगमेश्वर विद्यालयातील 1500 विद्यार्थ्यांना पिण्याचे शुद्ध पाणी मोफत देत आहेत. कोणत्याही सामाजिक कार्याला देणगी देत आहेत. दत्ताराम वैद हे मध्ये पारगाव ग्रामपंचायत पंचवार्षिक निवडणूकीत त्यांना विक्रमी मतांनी निवडून दिले आणि त्यांना समाज सेवेची
पावती मिळाली
गावातील मुक्तादेवी पायी दिंडी सोहळा मंडळ वतीने धर्मशाळा बांधण्यात येत असून या धर्म शाळेला 1 लाख 31 हजार रुपयांची देणगी दिली आहे. आपल्याला आई ,पत्नी पाहिजे मग मुलगी का नको म्हणून गावात सुकन्या योजना सुरु करुन प्रथम मुलगी जन्माला आल्यास त्या मुलीच्या नावावर बॅंकेत पाच हजार रुपयांची ठेव ठेवली जाते. मुलीचे वय 18 वर्षे झाल्यावर तिला 28 हजार रुपये मिळतात. तसेच दत्ताराम वैद हे आळंदी येथील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर मंडळावर विश्वस्त म्हणून काम करीत आहेत. अशा प्रकारे सामाजिक काम करीत आहेत.
संकलन: लक्ष्मण ढोबळे
पारगाव शिंगवे