कोंढवा – भारतीय जनता पार्टी पुरंदर-हवेली विधानसभा मतदारसंघाच्या वतीने आयोजित सोशल मीडिया बैठकीचे आयोजन समाधान मंगल कार्यालय येथे अन्न प्रक्रिया उद्योग केंद्रीय राज्यमंत्री प्रल्हादसिंह पटेल तसेच हिमाचलचे भारतीय जनता पक्षाचे प्रभारी संजय टंडन यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले होते. राजकारणात सोशल मीडिया महत्त्वाचाच असल्याचे प्रल्हादसिंह पटेल यांनी सांगितले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारने नऊ वर्षाच्या यशस्वी कार्यकाळात सेवा सुशासन आणि गरीब कल्याणासाठी घालवला आहे. यामुळे गरिबांना सुरक्षा प्राप्त होऊन त्यामुळे ते देशाच्या विकासाला गती देऊ शकले आहेत. देशातले सर्वात मोठे लसीकरण अभियान, 220 करोड नागरिकांना मोफत लसीकरण, 35 करोड पेक्षा जास्त नागरिकांना मोफत पक्की घरे, ग्रामीण भागात 100 टक्के शौचालयांची निर्मिती, घरोघरी नळ कनेक्शन, 9.6 करोड परिवाराला मोफत गॅस कनेक्शन, मोफत रेशन, सुविधा जन-धन योजना (पीएमजेडीवाई), जन-धन से जन सुरक्षा, प्रधानमंत्री जीवन ज्योती बीमा योजना (पीएमजेजेबीवाई), प्रधानमंत्री सुरक्षा बीमा योजना (पीएमएसबीवाई),अटल पेंशन योजना (एपीवाई), प्रधानमंत्री मुद्रा योजना, स्टॅंड अप इंडिया योजना, प्रधानमंत्री जय वंदे योजना या सारख्या केंद्र सरकारच्या विविध योजना अधिकाधिक नागरिकांपर्यंत पोहोचविण्याचे सर्वोत्तम माध्यम म्हणजे सोशल मीडिया आहे.
यावेळी जिल्हाध्यक्ष गणेश भेगडे, सरचिटणीस अविनाश मोटे, प्रा. राम शिंदे, श्रीकांत थिटे, मारुती किंडरे, डॉ. तेजस्विनी गोळे, स्नेहल दगडे, धनंजय कामठे, सचिन हांडे, पंडित मोडक, संदीप हरपळे, राजेंद्र भिंताडे तसेच भाजपाचे प्रमुख पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते. प्रास्ताविक जालींदर कामठे यांनी केले तर धनंजय कामठे यांनी आभार मानले.