शिंदे वासुली -चक्रीवादळ व दोन तीन दिवसांपासून आसखेड धरण परिसरात होत असलेल्या अवकाळी पावसाने लाखमोलाचा कांदा भिजून गेला आहे. आधीच भाव नाही त्यात कांदा भिजल्याने तोही खराब झाल्याने हातात उत्पादन खर्चही पडणार नसल्याने शेतकऱ्यांच्या डोळ्यात अश्रू आले असून त्यांनी पंचनामाकरून नुकसानभरपाईची मागणी केली आहे.
वाकी तर्फे वाडा येथील मारुती कोळेकर या शेतकऱ्याचे पत्र्याची पडवी उडून साठवलेला कांदा भिजल्याने सुमारे लाखो रुपयांचे नुकसान झाले. त्यांच्या घरापुढील आंबा व फणसाच्या झाडांचीही मोडतोड झाली आहे.
या परिसरात वादळाने शेतकऱ्यांनी कांदा व अन्य पिकं साठवून ठेवलेली शेडस्, पडवी व त्यावरील पत्रे उडून मोडतोड झाली. तसेच अवकाळी पावसाने शेतातील व साठवलेली कांदा व अन्य पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. दरम्यान, प्रशासनाकडूपन पंचनामे करण्यात येत आहे. सुरुवात केली आहे.