माजातील चौकट मोडण्याचे काम समाजसेवक करतात. त्या पद्धतीने समाजातील जो वंचित आहे, नाही रे वर्गातील आहे; त्यांना शिक्षण देऊन सुधारण्याचे काम दैनिक “प्रभात’ व दिशा परिवारातील समाजसेवक करत आहेत. हे बोलते कर्ते नाही, तर करणारे खरे कर्ते समाजसुधारक आहेत, असे प्रतिपादन सुंदराबाई कन्या विद्यालयाच्या मुख्याध्यापिका स्मिता पानसरे यांनी केले. आज समाजामध्ये अनेक हत्यारे आहेत. मात्र, या सर्व हत्यारांमध्ये ज्ञानाचे हत्यार खूप मोठे आहे.
ते ज्ञान घेण्यासाठी आवश्यक असलेली आर्थिक मदत दैनिक प्रभात व दिशा परिवाराच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना होत आहे. ज्ञानाच्या जोरावर समाज घडविण्याचे काम करता येते. एक सामाजिक बांधिलकी आणि आपण समाजाचे काही देणे लागतो, या भावनेतून ही मदत करण्यात येत आहे. त्यामुळे मदत घेणाऱ्या विद्यार्थ्यांना दातृत्वाला न विसरता ज्या कारणासाठी मदत झाली, त्यासाठी तो खर्च करा.
आज दुर्बल व नाही रे वर्गाकडे कोणाला लक्ष देण्यास वेळ नाही. मात्र, दैनिक प्रभात व दिशा परिवारासारखे माणसे असल्याने समाजामध्ये चांगूलपणा शिल्लक आहे. अशामुळे आज समाजातील दुर्बल घटकांना मदतीचा हात मिळत आहे. त्यामुळे दैनिक प्रभात व दिशा परिवाराचे कौतुक करावे तेवढे थोडे आहे.