मुंबई: महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांच्या निकालानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोठे विधान केले आहे. भाजपने कधीही शिवसेनेला 50-50 चे वचन दिले नव्हते. महाराष्ट्रात भाजपच्या नेतृत्वातचं सरकार स्थापन होईल आणि राज्यात मी पाच वर्षे मुख्यमंत्री राहील, असे त्यांनी स्पष्ट केले.
राज्यात सरकार स्थापनेसाठी चांगलाच गदारोळ सुरु आहे. दरम्यान शिवसेना खासदार संजय राऊत यांनी देवेंद्र फडणवीस यांचा एक 50-50 चे वचन दिल्याचा व्हिडीओ माध्यमांसमोर दाखवला आहे. संजय राऊत म्हणाले, जर मुख्यमंत्री असे म्हणत असतील की 50-50 ‘वर कधीच चर्चा झाली नाही, तर मला वाटते की सत्याची व्याख्या बदलण्याची गरज आहे. मुख्यमंत्री ज्या विषयावर बोलत आहेत त्या संदर्भात सर्वांना माहिती आहे. ते माध्यमांसमोर बोलले होते.
मुख्यमंत्र्यांनी स्वत: 50-50 फॉर्मुला’चा उच्चार केला होता, उद्धवजींनीही याबद्दल बोलले होते. जर मुख्यमंत्री म्हणत असतील मी बोललोच नाही तर मी नतमस्तक करतो. जे कॅमेरा समोर बोलले त्यालाच मुख्यमंत्री नकार देत आहेत, असे राऊत म्हणाले.
शिवसेनेने अडीच वर्षासाठी मुख्यमंत्री पदाची मागणी केली आहे. मात्र भाजप हाय कमांडने याला विरोध केला आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा 30 ऑक्टोबरला मुंबईला येणार असून त्यांची भाजपा आमदारांशी बैठक होणार आहे.