ठाणे – शिवसेना जशी सत्तेत आली आहे तशी अनेकांची पोटदुखी सुरू झाली. शिवसेनेने अनेक अनुभव बघितलेत. शिवसेना कधी घाबरली नाही आणि घाबरणारही नाही, असे नमूद करतानाच शिवसेना नेते आणि राज्यातील मंत्री एकनाथ शिंदेंनी किरीट सोमय्यांना आव्हान दिले आहे.
आम्ही महाविकास आघाडी म्हणून नवाब मलिकांच्या पाठिशी आहोत. सरकार कोणाचेही जास्त काळ राहत नाही बदलत असते. त्यामुळे विचार करावा. मुंबईत संकटकाळात कोण धावून जाते हे सगळ्यांना माहिती आहे. त्यामुळे मुंबईत शिवसेनाच असेल.
उत्तर प्रदेशात चांगला प्रतिसाद पक्षाला आम्हाला मिळतोय हे तुम्ही पाहताय. आमच्यात कोणतेही मतभेद नाहीत. मुंबईत सुभाष देसाई उपस्थित आहेत. संजय राऊत युपीत आहेत, मंत्री आदित्य ठाकरे आहेत, मी आहे. मात्र मतभेद असण्याचे कारण नाही.