मुंबई – बॉलीवूड स्टार सुशांतसिंह राजपूतने 14 जून रोजी आत्महत्या केल्याने चित्रपटसृष्टीसह अनेकांना धक्का बसला. या आत्महत्येनंतर संपूर्ण देशातून प्रतिक्रिया उमटत आहेत. सुशांत त्याच्या मागे अनेक न सुटलेले प्रश्न सोडून गेला आहे. सुशांत च्या मृत्यूनंतर अनेकजण बॉलिवूडच्या घराणेशाहीवर टीका करत आहे, काहींनी या प्रकरणाची थेट कोर्टात तक्रार नोंदवली आहे.
‘काय पो छे’ चित्रपटातून सुशांतने बॉलिवूडमध्ये एंट्री घेतली मात्र त्याला खरी ओळख मिळाली ती ‘एम एस धोनी द अनटोल्ड स्टोरी’ या सिनेमातून. या चित्रपटातनंतर सुशांत रातोरात स्टार झाला. सूत्रांच्या माहितीनुसार या चित्रपटाचे बजेट जवळपास 104 कोटींचे होते.
एम एस धोनी सिनेमाने बॉक्स ऑफिसवर 216 कोटींची कमाई केली पण माहिती नुसार या चित्रपटासाठी सुशांतला फक्त दोन ते अडीच कोटी इतकेच मानधन देण्यात आले होते. मात्र एम एस धोनी सिनेमा रिलीज झाल्यानंतर सुशांतने आपले मानधन दुप्पट केले होते. हे पाहून अनेक निर्मात्यांनी आश्चर्य व्यक्त केले होते.