संयुक्त राष्ट्रे मुख्यालय, – जम्मू, काश्मिर आणि लडाखचा केंद्रशासित प्रदेश हा भारताचा अविभाज्य भाग होता, आहे आणि राहील, अशा शब्दात पाकिस्तानने जम्मू काश्मिरच्या संदर्भात केलेल्या ऊल्लेखासंदर्भात खडसावले.
त्याचवेळी पाकिस्तान संयुक्त राष्ट्रेने घोषित केलेल्या दहशतवाद्यांना सार्वधिक आश्रय हाच देश देत आहे, अमेरिकेवर दहशतवादी हल्ला करणाऱ्या ओसामा बिन लादेनला याच देशाने आश्रय दिल होता. आजही त्याचा शहीद म्हणून या देशाचे नेतृत्व गौरव करत असते, अशा शब्दात भारताने खडसावले.
पाकिस्तान हा जाळपोळ करणारा देश असून त्या कृत्याचा गौरव हा देश “आग से खेलनेवाला’ असा करत असतो. त्या देशाच्या धोरणाचा साऱ्या जगाला त्रास होतो. आपल्या भूमीत दहशतवाद्यांना हा देश आश्रय देत असतो, असे भारताच्या पहिल्या महिला सचिव स्नेहा दुबे यांनी सांगितले.
भारताने आपला उत्तर देण्याचा अधिकार वापरत पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांच्या भाषणातील मुद्द्यांवरुन शेजाऱ्यांना खडे बोल सुनावले. दुबे म्हणाल्या, जम्मू-काश्मिर आणि लडाख हा भारताचा अविभाज्य भाग होता, आहे आणि राहीलही. त्यात पाकिस्तानने बळजबरी बळकावलेल्या जमीनीचाही समावेश आहे. पाकिस्तानने बळकावलेला हा भू भाग तातडीनेखाली करावा, असे आवाहन आम्ही करत आहोत.
संयुक्त राष्ट्रेने उपलब्ध करून दिलेल्या व्यासपीठाचा पाकिस्तान आमच्या देशाविरूध्द चुकीचा आणि खोटारडा प्रचार करण्यासाठी वापर करण्याची ही काही पहिली वेळ नाही, असे खेदाने म्हणावे वाटते. आपल्या देशात खुले आमपणे फिरणाऱ्या दहशतवाद्यांची वस्तूस्थितीवरून लक्ष विचलीत करण्यासाठी असे निष्फळ प्रयत्न करत आहे. त्या देशातील नागरिकांचे विशेषत: अल्पसंख्यांकांचे जीवन अत्यंत हालाखीचे आहे, याकडेही या तरूण राजनैतिक अधिकाऱ्याने लक्ष वेधले.
भारताच्या भूमिकेवर जाणीवपूर्वक जोर देत त्या म्हणाल्या, भारताला पाकिस्तानसह सर्व शेजारी देशांशी सलोख्याचे संबंध हवे आहेत. मात्र आपल्या देशाच्या भूमीचा वापर दहशतवाद्यांना भारतात पाठवण्यासाठी होऊ नये याची जबाबदारी आता पाकिस्तानची आहे. सर्व सदस्य देशांना दहशतवाद्यांना सक्रिय पाठींबा, मदत आणि आश्रय देण्याच्या पाकिस्तानाच्या इतिहासाची आणि धोरणाची सर्व सदस्य राष्ट्रांना कल्पना आहे.
पाकिस्तान धिक्काराचे “पुणे कनेक्शन’
भारताची बाजू संयुक्त राष्ट्रेत आक्रमकपणे मांडणाऱ्या स्नेहा दुबे यांचे पुण्याशी निकटचे संबंध आहेत. त्यांनी आपले शिक्षण फर्गसन महाविद्यालयात पूर्ण केले. त्या काळातच त्यांनी भारतीय परराष्ट्र सेवेत दाखल होण्याची तयारी केली होती. त्यानंतर जवाहरलाल नेहरू विद्यापीठातून त्यांनी एमफील केले आहे.