मुंबई : सिंगापूरला जाऊन आलेल्या आणि घरात विलगीकरणात राहण्यास सांगितलेल्या सहा प्रवाशांना गुजरातला जाणाऱ्या सौराष्ट्र एक्सप्रेसमधून उतरवण्यात आले. ही घटना मंगळवारी सकाळी बोरीवलीत रेल्वेस्थानकात घडली.
मुंबई सेंट्रलवरून बडोद्याला हे प्रवासी जात होते, असे पश्चिम रेल्वेच्या प्रवक्त्याने सांगितले. जर्मनीतून परतलेल्या गरीबरथमधून पालघर स्थानकांत सहप्रवाशांनी आक्षेप घेतल्यानंतर चार प्रवाशांना उतरवल्यानंतर हा प्रकार घडला.
राज्य सरकारने घरी विलगीकरणात राहण्यास सांगितलेल्या पण बाहेर पडणाऱ्यांवर कडक कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर हे आदेश देण्यात आले आहेत.