नवी दिल्ली – जम्मू-काश्मीरचा विशेष राज्याचा दर्जा ऑगस्ट 2019 मध्ये रद्दबातल करण्यात आला. तेव्हापासून तिथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यांत 118 नागरिक मृत्युमुखी पडले. त्यामध्ये 5 काश्मिरी पंडित तसेच 16 हिंदू आणि शीखांचा समावेश आहे.
संबंधित माहिती केंद्रीय गृह राज्यमंत्री नित्यानंद राय यांनी राज्यसभेत एका प्रश्नाच्या लेखी उत्तरात दिली. संबंधित कालावधीत 128 सुरक्षा जवान शहीद झाले. मागील तीन वर्षांत दहशतवादी हल्ल्यांच्या प्रमाणात घट झाली आहे.
जम्मू-काश्मीरात 2018 यावर्षी 417 दहशतवादी हल्ले झाले. ती संख्या 2021 मध्ये घटून 229 इतकी झाली. तेथील सुरक्षा स्थितीत लक्षणीय सुधारणा झाली आहे. दहशतवाद बिल्कूल खपवून न घेण्याचे धोरण केंद्र सरकारने स्वीकारले आहे, असे त्यांनी नमूद केले.
“…तर आरएसएस मुख्यालयावर राष्ट्रध्वज फडकवा”
पंतप्रधान विकास पॅकेजअंतर्गत काश्मिरी पंडितांना रोजगार उपलब्ध करण्यात आले आहेत. सध्या काश्मीर खोऱ्यात विविध सरकारी विभागांमध्ये 5 हजार 502 काश्मिरी पंडित रूजू आहेत, असेही त्यांनी सांगितले.
यशवंत सिन्हा यांनी द्रौपदी मुर्मू यांचे केले अभिनंदन; विरोधकांचे मानले आभार