कोलंबो – देशात निर्माण झालेल्या आर्थिक संकटामुळे यंदाची आशिया करंडक क्रिकेट स्पर्धा आयोजित करु शकत नसल्याचे स्पष्टीकरण श्रीलंका क्रिकेट मंडळाने दिले आहे. त्यामुळे आता ही स्पर्धा अमिराती किंवा भारतात होण्याची शक्यता वाढली आहे.
श्रीलंका क्रिकेट मंडळाने आशियाई क्रिकेट परिषदेला याबाबत माहिती दिली असून आर्थिक आणि राजकीय कारणांमुळे ही स्पर्धा आयोजित करु शकत नसल्याचे कळवले आहे. अशा स्थितीत आशिया चषक यूएई किंवा भारतामध्ये खेळल्या जाऊ शकते.
आशिया चषक यावर्षी श्रीलंकेत होणार होते, परंतु देशात आर्थिक संकट असल्यामुळे त्यांना हे यजमानपदही सोडावे लागणार आहे. 2018 सालापासून विविध कारणांमुळे ही स्पर्धा होऊ शकली नव्हती. तसेच गेल्या जवळपास तीन वर्षांपासून कोरोनाच्या वाढत्या धोक्यामुळे ही स्पर्धा आयोजित करण्यात आली नव्हती.
येत्या 26 आॅगस्टपासून सुरु होत असलेल्या या स्पर्धेत भारत, पाकिस्तान, बांगलादेश, श्रीलंका व अफगाणिस्तान हे संघ सहभागी होतात.