कोल्हापूर – आगी लावण्याचे धंदे बंद करावेत आणि शिवसेनेला लागलेल्या गळतीकडे अधिक लक्ष द्यावे, असे म्हणत केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्यावर पुन्हा एकदा टीकास्त्र सोडले आहे.
कोल्हापुरात पत्रकारांशी ते बोलत होते. भाजपने देशातील ऐक्य तोडण्याचे काम केले. तसेच गोपीनाथ मुंडे यांच्या तोडीचा एकही नेता आता भाजपमध्ये नसल्याचे विधान संजय राऊत यांनी केले. त्यावर बोलताना राणे म्हणाले की, मी भाजपमध्ये आहे. कोण कोणापेक्षा लहान आहे, याच मूल्यमापन मी करणार नाही.पण आगी लावण्याचे धंदे बंद करावेत आणि शिवसेनेला लागलेल्या गळतीकडे अधिक लक्ष द्यावे. नुसती टीका करून पक्ष वाढणार नाही, असा सल्ला देखील त्यांनी दिला.
सध्या राज्यांमध्ये पेपर फुटी प्रकरणावरून जोरदार चर्चा सुरू आहे. राज्याचा प्रमुखच सक्षम नसेल तर दुसरं काय होणार, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. तसेच गेल्या दोन वर्षात राज्य दहा वर्षांनी मागे गेले आहे. म्हाडा पेपरफुटीवर तसेच राज्यातील एकूणच पेपरफुटीच्या प्रकरणात भ्रष्टाचार झाले असल्याचे त्यांनी म्हटले आहे.