मुंबई – ‘तू ठाकरे है तो मे भी राणा हू, मी मुंबईची मुलगी आणि विदर्भाची सून आहे, तुम्ही शिवसेनेचे असाल तर मी पण विदर्भाची सून आहे, आमना सामना तर लवकरच होईलच, त्यात कळेल की कोण किती ताकदवान आहे.’ अशा शब्दांमध्ये अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांनी उद्धव ठाकरेंवर टीका केली.
या टीकेवर हिंगोली लोकसभेचे माजी खासदार सुभाष वानखेडे यांनी पलटवार केला आहे. ते माध्यमाशी बोलतांना म्हणाले,’उद्धव ठाकरेंना एकेरी भाषेत बोलण्याची नवनीत राणा यांची लायकी नाही. शिवसेनेच्या नादाला लागल्यास आगामी २०२४ मधील निवडणुकीत आम्ही राणांना त्यांची जागा दाखवून देऊ”, अशी टीका वानखेडे यांनी केली आहे.
दरम्यान, राज्यातील राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. शिवसेनेचे विश्वासू मानले जाणारे नेते एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंवर टीका केली असून भाजपच्या खासदार नवनीत राणा यांनीही हनुमान चालीसा वादावरून एकदा पुन्हा शिवसेनेवर हल्लाबोल केला आहे.
या आधी नवनीत राणा यांनी थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या निवासस्थानासमोर हनुमान चालीसा पठण करणार असल्याचा इशारा दिला होता. आता पुन्हा एकदा नवनीत राणा यांनी ठाकरेंवर हनुमान चालीसा पठाणाच्या मुद्यावरून एकेरी शब्दात टीका केली आहे.