पणजी – शिवसेना नेते आणि महाराष्ट्राचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी गोव्यातून भाजपवर घणाघात केला आहे. भाजपने आमच्या पाठीत खंजीर खुपसला. आमच्या नव्हे तर सर्व मित्रपक्षांच्या पाठितही खंजीर खुपसला आहे. त्यामुळेच एक एक करून सर्व पक्ष भाजपला सोडून गेले, असा हल्लाबोल आदित्य ठाकरे यांनी केला.
आदित्य ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेऊन विविध मुद्द्यांवर पत्रकारांशी संवाद ते म्हणाले,’शिवसेनेचे वाघ असतात. वाघांचा बाजार नसतो, असं आदित्य यांनी ठणकावून सांगितलं. तसेच आम्ही शिवसेनेचं किंवा कोणत्याही पक्षाचं भवितव्य ठरवण्यासाठी आलो नाही. तर आम्ही केवळ गोव्यातील भूमिपुत्रांच्या न्याय हक्कासाठी लढायला आलो आहोत, असं त्यांनी स्पष्ट केलं.
ते पुढे म्हणाले,आदित्य ठाकरेंनी गोव्यात सत्ताधारी पक्ष असलेल्या भाजपाला खोचक शब्दांत सवाल केला आहे. गोव्यात शिवसेना ११ जागांवर निवडणूक लढवत आहे. मात्र, शिवसेनेच्या उमेदवारांचं डिपॉझिट देखील जप्त होईल, अशी टीका भाजपाकडून केली जात असताना त्याला आदित्य ठाकरेंनी प्रत्युत्तर दिलं आहे.
ते म्हणाले, “जर कुणाला आमचा पक्ष इतकाच कमकुवत वाटत असेल, आमचे डिपॉझिट जप्त होणार असं वाटत असेल, तर मग आमच्यावर टीका कशाला करता? आमच्याबद्दल बोलता तरी का? भिती कसली वाटतेय? होऊ दे प्रचार”, असं ठाकरे म्हणाले आहेत.