कोल्हापूर – राज्यात चार नव्हे तर अनेक केंद्रीय मंत्री केले आणि कोकणातील पंतप्रधान केला तरी शिवसेनेला काहीही फरक पडत नाही, अशी टिका उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी नूतन सूक्ष्म, लघू, मध्यम मंत्री नारायण राणे आणि भाजपवर नामोल्लेख टाळून मंगळवारी केली.
कोल्हापूर जिल्ह्यात शिवसेनेला एक नंरबचा पक्ष बनवण्यासाठी कार्यकर्त्यांनी शिवसंपर्क अभियान प्रभावीपणे राबवण्याचे आवाहनही त्यांनी केले. ते कोल्हापुरात शिवसंपर्क अभियानच्या उदघाटनप्रसंगी बोलत होते.
यावेळी सावंत यांनी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यावरही हल्लाबोल केला. स्वत:च्या ग्रामपंचायतमध्ये सत्ता नसलेल्यांनी आम्हाला शिकवू नये, अशी टिका मंत्री सामंत यांनी चंद्रकांत पाटील यांचे नाव न घेता केली.
आमदार क्षीरसागर यांनीही चंद्रकांत पाटील यांच्यावर टीका केली. विधानसभेवेळी माझ्या पाठीत काही जणांनी खंजीर खुपसल्याने पराभव झाला. मंत्री पदाची संधी चालून आली होती, त्यावेळी एका नेत्याने विरोध केल्याचे म्हणत क्षीरसागर यांनी टीका केली.