नगर (प्रतिनिधी) – कर्नाटक सरकारने छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा रात्रीतून हटविला. त्या घटनेच्या निषेधनार्थ आज नगर शहर शिवसेनेच्यावतीने माळीवाडा बसस्थानक चौकात आंदोलन करण्यात आले. चौकातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यासमोर कर्नाटक सरकारचा निषेध करत शिवसैनिकांची कर्नाटक सरकार व मुख्यमंत्र्यांच्या पुतळा जाळला.
शिवसेनेचे जिल्हाप्रमुख प्रा. शशिकांत गाडे, शहरप्रमुख दिलीप सातपुते, माजी महापौर भगवान फुलसौंदर, अभिषेक कळमकर, माजी शहर प्रमुख संभाजी कदम, ज्येष्ठ नगरसेवक बाळासाहेब बोराटे, अनिल बोरुडे, जिल्हा परिषद सदस्य संदेश कार्ले, राजेंद्र भगत, संजय शेंडगे, दत्ता जाधव, श्याम नळकांडे, विजय पठारे, परेश लोखंडे, प्रशांत गायकवाड, आनंद लहामगे, सचिन शिंदे, संतोष गेनप्पा, विशाल वालकर आदी पदाधिकारी व शिवसैनिक यावेळी उपस्थित होते.
जिल्हाप्रमुख प्रा. गाडे यांनी कर्नाटक सरकारवर यावेळी टीका केली. छत्रपती शिवाजी महाराज संपूर्ण भारताचे दैवत आहेत. शिवरायांचा अवमान हा लोकभावनेचाच अवमान आहे. या घटनेने जनतेच्या भावना दुखावल्या आहेत. त्यामुळे कर्नाटक सरकारने तत्काळ माफी मागून पुतळा पुर्ववत बसवावा, अशी भूमिका प्रा. गाडे यांनी यावेळी मांडली. तसेच असा तुघलकी कारभार करणाऱ्यांवर कठोर कारवाई झाली पाहिजे, अशी भूमिकाही त्यांनी मांडली.
माजी शहरप्रमुख संभाजी कदम यांनीही मनोगत व्यक्त केले. छत्रपती शिवाजी महाराजांना संपूर्ण जगात आदराचे स्थान आहे. शिवाजी महाराजांचा पुतळा कर्नाटक सरकारने हटवून देशद्रोह केला आहे.त्यामुळे यामागे असणाऱ्यांना कडक शासन झाले पाहिजे. शिवसेना अशा घटनेचा निषेध करुन संबंधितांवर कारवाईची मागणी करत आहे, अशी भूमिका संभाजी कदम यांनी मांडली. शिवसैनिकांनी यावेळी कर्नाटक सरकारच्या निषेधाच्या घोषणा दिल्या.