सविंदणे (पुणे) – कवठे येमाई (ता. शिरूर) येथील दोन सख्या भावांमध्ये जमीन वाटपावरून झालेल्या वादातून बाबाजी रानू जाधव तसेच दोन महिलांनी लाकडी दांडक्याने जबर मारहाण केली. या घटनेत भाऊ रानू जाधव (वय 56, रा. कवठे येमाई ता. शिरूर) याचा मृत्यू झाला. याबाबत संतोष भाऊ जाधव यांनी शिरूर पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली आहे.
याप्रकरणी बाबाजी रानू जाधव (वय 53 , रा. कवठे येमाई ता. शिरूर) यास शिरूर पोलिसांनी अटक केली आहे. सहायक पोलीस निरीक्षक संदीप कांबळे तपास करीत आहेत.
तीनच महिन्यापूर्वी कवठे येमाई येथे जमिनीच्या वादातून खून झाला होता. आता पुन्हा जमिनीच्या वादातून भावानेच भावाचा खून केला. जमिनीच्या वादावर तोडगा काढण्यासाठी तंटामुक्त समिती पुर्नजीवीत करून कायदेशीर मार्गाने वाद मिटवणे ही काळाची गरज बनली आहे.