मुंबई – जालन्यात मराठा आंदोलकांचं मराठा आरक्षणासाठी आंदोलन सुरु होतं. या आंदोलनादरम्यान पोलिसांकडून लाठीचार्ज झाल्याची मोठी बातमी समोर आली आहे. आंदोलनासाठी उभारण्यात आलेल्या मंडपात पोलीस घुसले आणि त्यांनी आंदोलकांवर लाठीचार्ज केल्याचे समजते.आंदोलकांकडून दगडफेक झाल्याचा आरोप पोलिसांकडून करण्यात आला आहे.
महाराष्ट्रात सध्या फक्त आणि फक्त हुकूमशाही चालू आहे. राज्य सरकार आणि गृह खात्यावर राज्यात शांतता प्रस्थापित करण्याचे काम असते, परंतु गृहमंत्रालयातील प्रशासकांनी पोलिस बळाचा वापर करून मराठा आंदोलकांवर तीव्र लाठीचार्ज केलेला आहे. हि अतिशय संतापजनक बाब आहे . जालन्यात झालेल्या ह्या…
— Sharad Pawar (@PawarSpeaks) September 1, 2023
दरम्यान, या घटनेचे पडसाद राज्यभरात दिसत आहे. अशात छत्रपती संभाजी नगर या ठिकाणी बसची जाळपोळही करण्यात आली. या सगळ्या पार्श्वभूमीवर शरद पवार यांनी मोठा निर्णय घेतला आहे. शरद पवार यांनी ट्विट करत याबाबत सांगितले आहे.
शरद पवार यांचे ट्विट
महाराष्ट्रात सध्या फक्त आणि फक्त हुकूमशाही चालू आहे. राज्य सरकार आणि गृह खात्यावर राज्यात शांतता प्रस्थापित करण्याचे काम असते, परंतु गृहमंत्रालयातील प्रशासकांनी पोलिस बळाचा वापर करून मराठा आंदोलकांवर तीव्र लाठीचार्ज केलेला आहे. हि अतिशय संतापजनक बाब आहे . जालन्यात झालेल्या ह्या अमानवीय घटनेला राज्याचे गृहमंत्रालय जबाबदार असून मी या घटनेचा जाहीर निषेध व्यक्त करतो.