Sharad Pawar । सत्ताधारी भारतीय जनता पक्षासह सर्वच राजकीय पक्षांकडून खेळल्या जाणार्या राजकीय डावपेचामुळे देशातील वातावरण तापलं आहे. निवडणुकीचा कार्यक्रम अद्याप जाहीर व्हायचा आहे. परंतु, भाजपने पहिल्याच यादीत 195 उमेदवारांची नावे जाहीर करून वातावरण अधिक तापविलं आहे. अशात महाराष्ट्रातील बारामती मतदार संघ सर्वात जास्त चर्चेत आला आहे. कारण येते पवार विरुद्ध पवार असा सामान बघायला मिळण्याची शक्यता आहे.
बारामती लोकसभा मतदार संघातून महाविकास आघाडीकडून शरद पवार यांच्या गटातील सुप्रिया सुळे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. अशात शरद पवार यांनी नुकतेच बारामतीमध्ये केलेले भाषण चर्चेत आले आहे. बारामती या ठिकाणी एका मेळाव्याला संबोधित करताना शरद पवार यांनी केलेले वक्तव्य चर्चेत आहे. एवढंच नाही तर सुप्रिया सुळेंबाबतही शरद पवारांनी महत्त्वाचं विधान केलं आहे.
Sharad Pawar । शरद पवार नेमकं काय म्हणाले…
‘पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि माझे चांगले संबंध आहेत. पण त्यांची धोरणं मला पटत नाहीत. मोदी बारामतीत आले होते. त्यावेळी म्हणाले होते की माझं बोट धरुन राजकारणात आले. अशी खोचक टीका पवार यांनी केली.
ते पुढे म्हणाले, ‘मी कधीही काम करत असतांना पक्षाचा विचार केला नाही. मी नेहमीच माझ्या विचारांशी पक्क राहण्याचा विचार केला आहे. सर्वांनी संसद संस्था जतन केली पाहिजे. मागे अधिवेशन झालं, त्या अधिवेशनात पंतप्रधान २४ मिनिटं आले. संसदेत बोलण्याची गरज पंतप्रधान नरेंद्र मोदींना वाटत नाही, असे असेल तर लोकशाही धोक्यात येईल.’ असेही ते म्हणाले आहे.
Sharad Pawar । पक्ष चिन्हा बाबत शरद पवार म्हणाले…
‘राष्ट्रवादीची स्थापना मी केली. निवडणूक आयोगाने निकाल दिला की खरी राष्ट्रवादी शरद पवारांची नाही. ज्यांच्या हातात पक्ष दिला त्यांना विधीमंडळात मी आणलं होतं. काही गोष्टी त्यांच्या वैयक्तिक आहेत. ते वेळ देतात, कष्ट करतात. मर्यादा आणण्यासाठी अनेक प्रकारच्या मर्यादा घालण्यात येत आहे. आम्ही सांगेल तशी व्यक्ती नेमली तर हवा तसा निकाल येईल म्हणून निवडणूक आयुक्त नेमण्याच्या पद्धतीत मोदींनी बदल केला. ‘ असं शरद पवार यांनी म्हणाले.
हे वाचलं का ?
निलेश लंकेंबाबत अजित पवार म्हणाले,’शरद पवार गटात जाणार अशी चर्चा..’