मुंबई – शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामनामधून अनेकदा भाजपवर मार्मिक टोलेबाजी केली जाते. यामध्ये अनेकदा भाजपचा उल्लेख ‘कमळाबाई’ असा केल्याचे अनेकदा पाहायला मिळाले आहे. यावरूनच आता भाजपचे मुबई अध्यक्ष आशिष शेलार यांनी आम्ही तुम्हाला पेंग्विन सेना म्हणायचं का? असा थेट सवाल उद्धव ठाकरेंना विचारला आहे.
शेलार यांनी उद्धव ठाकरेंना एक पत्र लिहिले आहे ज्यात त्यांनी थेटपणे इशारा देखील दिला आहे. आपल्या पत्रात आशिष शेलार म्हणतात,” “मा. श्री.उध्दवजी ठाकरे, महोदय आपण आमच्या कमळाला हिणवायला “बाई” म्हणताय ? हरकत नाही, बाईमध्ये आई, ताई आणि कडक लक्ष्मीपण आहे.त्यामुळे तुमच्या उरल्यासुरल्या पक्षाला, आम्ही आता “पेग्विन सेना ” म्हणायचे का? ता.क. असे कडक अस्सल मुंबईकर शब्द आमच्याकडे पण आहेत !”
कृपया,हे लक्षात असू द्या!@OfficeofUT pic.twitter.com/w1DFqYbU6q
— Adv. Ashish Shelar – ॲड. आशिष शेलार (@ShelarAshish) September 3, 2022
शेलार यांनी आपल्या अधिकृत ट्विटरवरून हे पत्र पोस्ट करत थेट उद्धव ठाकरेंना टॅग केले आहे. आगामी महापालिका निवडणुकांच्या दृष्टीने आशिष शेलार मुंबईत भाजपची जोरदार मोर्चेबांधणी करत आहेत. शिवसेनेनकडून मात्र अद्याप शेलारांच्या या पत्रावर कोणतीही प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही.