शकुंतला देवीवर आगामी बायोपिकची तयारी करण्यासाठी विद्या बालनने “मिशन मंगल’ रिलीजनंतर 15 दिवसांचा ब्रेक घेतला आहे. “ह्युमन कॉम्प्युटर’म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शकुंतला देवी गणितातल्या तज्ञ होत्या. त्यांच्या नावावर 1982 सालीच गणितातील आकडेमोड तोंडी करण्याचा विश्वविक्रम जमा झाला आहे.
शकुंतला देवी केवळ गणितज्ञ नव्हत्या तर त्या खगोलशास्त्रज्ञ आणि लेखिकाही होत्या. त्यांनी होमोसेक्स्युऍलिटी या विषयावर काही पुस्तके लिहीली आहेत. या सगळ्याचा अभ्यास विद्याला करायचा आहे, म्हणूनच तिला 15 दिवसांचा ब्रेक पाहिजे आहे.
सर्वसधारण ब्राम्हण कुटुंबातील कन्या ते आंतरराष्ट्रीय पातळीवरील विख्यात गणित तज्ञ असा प्रवास या बायोपिकमध्ये दर्शवण्यात येणार अहे. “कहानी’वाल्या विक्रम मल्होत्राच्या टीमकडूनच या सिनेमाची निर्मिती केली जाते आहे, याचाही विद्याला आनंद आहे.