पाकच्या कृतीवर एअर इंडियाची प्रतिक्रिया
नवी दिल्ली : केंद्र सरकारने कलम 370 रद्द केल्यानंतर पाकिस्तानने भारताला कात्रीत पकडण्याचा केविलवाणा प्रयत्न सुरू केला आहे. त्यासाठी पाकने भारतासोबतचे व्यापारी संबंध तोडले. एवढ्यावरच न थांबता पाकने हवाई मार्गदेखील बंद केला आहे. दरम्यान, पाकिस्तानच्या या कृतीने आम्हाला काहीही फरक पडणार नसल्याचे एअर इंडियाने पाकिस्तानला म्हटले आहे.
पाकिस्तानने काही काळासाठी आपली हवाई मार्ग बंद करण्याचा निर्णय घेतला. मात्र पाकिस्तानने हवाई मार्ग बंद केल्याने फरक पडणार नाही असे एअर इंडियाने म्हटले आहे. एअर इंडियाच्या एका अधिकाऱ्याने, पाकिस्तानने काही काळासाठी आपली हवाई हद्द बंद करण्याचा निर्णय घेतल्यामुळे विमानांच्या मार्गांमध्येही काही बदल करण्यात आले आहेत. यामुळे 12 मिनिटांचा वेळ हा वाढणार आहे. तसेच हवाई हद्द बंद केल्याने फरक पडणार नसल्याचे म्हटले आहे. बीसीएएसने सर्व विमानतळांवर चोख सुरक्षा व्यवस्था तैनात करण्याचे आदेश दिले आहेत. भारताने जम्मू काश्मीरमधून कलम 370 हटवल्याच्या विरोधात पाकिस्तानने हा निर्णय घेतला असल्याची माहिती मिळत आहे.