नवी दिल्ली – लॉकडाऊनच्या काळात उत्पादन बंद झाल्यामुळे वाहन उद्योगाला सेमीकंडक्टरचा तुटवडा जाणवत आहे. मात्र हा तुटवडा काही महिन्यानंतर संपुष्टात येईल आणि 2022 मध्ये परिस्थिती सुरळीत होईल असे मारुती सुझुकी कंपनीचे अध्यक्ष आर सी भार्गव यांनी सांगितले.
सेमीकंडक्टरच्या तुटवड्यामुळे मारुती सुझुकी कंपनीच्या उत्पादनावर काही प्रमाणात परिणाम झाला असल्याचे त्यांनी मान्य केले. इलेक्ट्रिक वाहने परवडण्याच्या टप्प्यात आल्यानंतर मारुती सुझुकी इलेक्ट्रिक वाहनाची निर्मिती करणार असल्याचे त्यांनी सूचित केले.