मुंबई – केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी मंगळवारी प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष कर विभागाच्या अधिकाऱ्यांशी चर्चा केली.
सिताराम बुधवारी इंडियन बॅंक असोसिएशनशी संलग्न बॅंक अधिकाऱ्यांशी चर्चा करणार आहेत. यावेळी कर्ज पुरवठा वाढविण्याबाबत आणि अनुत्पादक मालमत्ता कमी करण्याबाबत चर्चा होणार असल्याचे सांगितले जाते.
आता करोनाचा प्रभाव कमी झाल्यामुळे आगामी काळामध्ये अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना केंद्र सरकार करण्याची शक्यता आहे. त्याचाच एक भाग म्हणून अर्थमंत्री बॅंकर्सबरोबर चर्चा करणार आहेत. सितारामन उद्योजकांच्या संघटनाबरोबरही चर्चा करणार असल्याचे सांगितले जाते.