मुंबई – शिवसेनेनंतर राष्ट्रवादीत देखील फूट (ncp split) पडली आणि अजित पवार हे भाजपसोबत (bjp) सत्तेत सामील झाले. राष्ट्रवादीतील (ncp) फुटीनंतर शरद पवार आणि अजित पवार असे दोन गट पडले.यानंतर हे प्रकरण निवडणूक आयोगासमोर (Election Commision) गेलं. आज याबाबतची दुसरी सुनावणी पार पडली. यादरम्यान अजित पवार गटाने अनेक कायदेशीर मुद्दे निवडणूक आयोगासमोर मांडले. ज्यामध्ये शरद पवार यांची पक्षात अधिकारशाही होती असा आरोप अजित पवार गटाकडून अधोरेखित करण्यात आले. (Selection of Sharad Pawar is not according to rules)
घर चालवल्याप्रमाणे शरद पवार (Sharad pawar) पक्ष चालवत होते असा प्रमुख मुद्दा यावेळी अजित पवार गटाच्या युक्तिवादामध्ये होता. युक्तिवादादरम्यान शरद पवार यांच्या निवडीवरच अजित पवार गटाकडून आक्षेप घेण्यात आला. विशेष म्हणजे यावेळी अजित पवार गटाकडून वारंवार शिवसेनेच्या फुटीच्या निकालाचा दाखल देखील यावेळी दिला गेला.
शरद पवारांची निवड नियमांना धरून नाही असाही युक्तिवाद यावेळी अजित पवार गटाकडून करण्यात आला. शरद पवार स्वतः निवडून आलेले नाहीत मग इतरांची निवड कशी केली ? असा सवाल देखील यावेळी अजित गटाकडून उपस्थित करण्यात आला. सादिक अली केसचा दाखल देत आमदारांच्या संख्येला महत्व असल्याचे देखील अजित गटाने युक्तिवादादरम्यान अधोरेखित केले.
आज पंधरा मिनिटे उशिराने सुनावणीला सुरुवात झाली. त्यानंतर अजित पवार गटाचे वकील नीरज किशोर कौल यांनी युक्तिवादाला सुरुवात केली. कौल यांनी आक्रमक युक्तिवाद करत थेट शरद पवारांच्या निवडीवरच प्रश्नचिन्ह उपस्थित केलं.अजित पवार गटाची भूमिका ऐकून घेतल्यानंतर शरद पवार गटाची भूमिका निवडणूक आयोग ऐकणार आहे. दोघांच्या युक्तिवादातील मुद्द्यांचा विचार करुन निवडणूक आयोग याबाबतचा अंतिम निर्णय घेणार आहे.