बंगलोर – कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी बेळगाव जिल्ह्यावरून महाराष्ट्र आणि राज्य यांच्यातील सीमावादाच्या नूतनीकरणावर आवाज उठवला आणि म्हटले की, त्यांचे सरकार सीमाप्रश्नावर तडजोड करणार नाही.
मुख्यमंत्री बसवराज बोम्मई म्हणाले की, ‘महाराष्ट्रातील शिष्टमंडळ केंद्रीय गृहमंत्र्यांना भेटल्याने काही फरक पडणार नाही. महाराष्ट्राने यापूर्वीही हा प्रयत्न केला आहे. हे प्रकरण सुप्रीम कोर्टात आहे आमचे सरकार सीमाप्रश्नावर तडजोड करणार नाही. बोम्मई म्हणाले की त्यांनी कर्नाटकातील खासदारांच्या शिष्टमंडळाला सीमा प्रश्नासंदर्भात सोमवारी शाह यांना भेटण्यास सांगितले आहे.’
यावर आता मंत्री गुलाबराव पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे,’अमित शहा यांच्या भेटीनंतरही काही फरक पडणार नाही, अशी भाषा म्हणजे उन्मादाची बाब आहे. अमित शहा हे देशाचे गृहमंत्री आहेत सर्वात मोठ्या पक्षाचे ते दोन वेळेस अध्यक्ष राहिलेले आहेत. कायदा सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी त्यांच्यावर आहे. अशा परिस्थितीत त्यांनी तडजोडीची भूमिका घेतल्यावरही आम्ही काहीच करू देणार नाही, याचा अर्थ याला रगड म्हटल जातं…’ असेही ते म्हणाले आहे.