नगर – शाळांचे प्रशासन आणि व्यवस्थापन सुधारण्याच्या हेतूने वर्षातून तीन वेळा शाळा तपासणी करण्याचे निर्देश शिक्षण आयुक्त तथा विद्या प्राधिकरणाचे संचालक विशाल सोळंकी यांनी दिले आहेत.
केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाने देशातील सर्व राज्यातील शिक्षण विषयक स्थितीचे मूल्यांकन करण्यासाठी कार्यक्षमता प्रतवारी दर्शक तयार केले आहेत. त्यात 70 निकष आहेत. एखाद्या राज्यातील शिक्षण, शाळा यांच्या पीजीआय ठरवण्यासाठी युडायएस पोर्टल, शगुण पोर्टल, एमडीएम पोर्टल आदींमध्ये शाळांनी सादर केलेली माहिती तपासली जात आहे.
शिवाय केंद्र शासनाच्या शाळा सिद्धी या महत्त्वाकांक्षी उपक्रमात राज्यातील शाळांना मिळालेली गुणही राज्याची क्रमवारी ठरवताना महत्त्वपूर्ण भूमिका बजावणार आहे. तूर्त केंद्र शासनाने 2017-18 या वर्षांतील माहितीच्या आधारावर राज्यांची क्रमवारी निश्चित केली आहे. त्यात शाळांमध्ये शालेय प्रशासन आणि व्यवस्थानची श्रेणी सुधारण्यासाठी शासनाने मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. त्यानुसार शिक्षणाधिकारी आणि त्यांच्या अधिनस्थ यंत्रणेने वर्षातून तीन वेळा शाळा तपासणी करावी.