मनिला – आशिया करंडक बॅडमिंटन स्पर्धेत मंगळवारी झालेल्या पहिल्या फेरीच्या लढतीत भारताची स्टार बॅडमिंटन जोडी सात्किवसाईराज रांकीरेड्डी व चिराग शेट्टी यांनी थाटात विजय मिळवला. या विजयासह या जोडीने स्पर्धेच्या दुसऱ्या फेरीत प्रवेश केला.
येथे सुरू झालेल्या या स्पर्धेत भारताच्या पी. व्ही. सिंधू व लक्ष्य सेन यांच्याकडून पदकाची अपेक्षा केली जात असताना रांकीरेड्डी व शेट्टी या जोडीने पहिल्या फेरीत मिळवलेला विजय भारतीय खेळाडूंच्या आणखी सरस कामगिरीची ग्वाही देणारा ठरला आहे.
या जोडीने पहिल्या फेरीच्या सामन्यात थायलंडच्या एपीलुक गेटारहोंग व नॅचानोन तुलामोक जोडीवर अवघ्या 27 मिनिटांत 21-13, 21-9 असा सहज विजय प्राप्त केला.