भरत लोकरे; हरकती पाठवण्यासाठी ओबीसी बांधवांचा मेळावा
सातारा : ओबीसींना न्याय मिळवून देण्यासाठी मायक्रो ओबीसी रणांगणात उतरला आहे. आता ओबीसींना न्याय मिळणारच, असे मत भरत लोकरे यांनी व्यक्त केले.
ओबीसी आरक्षणासंदर्भातील मराठ्यांना दिलेल्या आरक्षणावर मागासवर्ग आयोगाने हरकती 16 फेब्रुवारी पर्यंत मागवलेल्या आहेत. त्या हरकती पाठवण्यासाठी सातारा कासार समाज संघटनेच्यावतीने सातारा कासार कालिका मंदिरात शहरातील ओबीसी बांधवांचा मेळावा संपन्न झाला. त्या मेळाव्यात प्रमुख वक्ते ते म्हणून बोलत होते. अध्यक्षस्थानी हेमंत कासार होते.
मेळाव्यात गुरव समाजाचे नेते गुरव, माजी नगरसेवक श्रीकांत आंबेकर, साळी समाज कार्यकर्त्या सौ. ठोके, नाभिक समाजाचे नेते विजय सपकाळ, सामाजिक कार्यकर्ते वैभव फरांदे , महिला आघाडी जिल्हाध्यक्ष सौ. सुनीता लोहार, कार्याध्यक्ष शांता जानकर, जिल्हा महा सचिव प्रमोद क्षीरसागर यांनी मते व्यक्त केली.
अध्यक्षीय भाषणात माननीय हेमंत कासार यांनी मागासवर्ग आयोगाकडे जिल्ह्यातून लाखोंच्या संख्येने हरकती जाणे गरजेचे आहे. उद्यापासून कासार कालिका देवी मंदिरात ओबीसी समाजाचे कार्यकर्ते ऑफिस सुरु करून हरकती नोंदवून घेणार आहेत. सातारा शहरातील ओबीसी बांधवांनी संघटनेने छापलेल्या हरकती आपले नाव मोबाईल नंबर पत्ता व सही करून द्याव्यात. पाठवण्याची व्यवस्था ओबीसी संघटना करणार आहे.असे सूचित केले.
अनिल हेडे यांनी सूत्रसंचालन केले. मेळावा यशस्वी करण्यासाठी रवीशेठ, उमेश पालकर, भाऊ कुंदप, अशोकराव कुंदप. भानुदास मोहिरे, सारंग रांगोळे. शामराव सासवडे या कासार समाज बांधवांनी मोलाचे सहकार्य केले. मेळाव्यास हरिदास जाधव, अशोक लोहार, जायभाय, प्रकाश खटावकर, दत्तात्रय कुंभार, मसुरकर, घाडगे, भिकाजी सूर्यवंशी व जाती संघटनेचे प्रतिनिधी हजर होते. अनिल हेडे यांनी आभार मानले.