सातारा – माण तालुक्यातील कुकुडवाडचे चिन्मय कुलकर्णी यांची भाजपाच्या युवा मोर्चाच्या जिल्हाध्यक्षपदी निवड झाली आहे. त्यांना निवडीचे नियुक्तीपत्र भाजपाचे जिल्हाध्यक्ष धैर्यशील कदम यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले.
चिन्मय कुलकर्णी यांनी कॉलेज जीवनात समाजकार्याला सुरुवात केली. रस्त्यावर दररोज घडत असलेले अपघात, त्या अपघातात जाणारे जीव पाहून त्यांनी पुणे-बंगलोर राष्ट्रीय महामार्गाचा मुद्दा घेतला. त्यांनी महामार्गावर पडलेले खड्डे, झालेले खराब रस्ते यावर आवाज उठवून प्रशासनाला महामार्गाचे चांगले काम करायला त्यांनी भाग पाडले होते. करोना काळात सुद्धा त्यांनी गोरगरीब वंचितांच्या मदतीला धावून जाण्याचे सदकार्य केले. कोणताही आणि कसलाही राजकीय घरात पिंड नाही, राजकीय वारसा नाही. परंतु त्यांचे सुरु असलेले समाजकार्य, लोकांच्यासाठी सुरु असलेले तळमळ पाहूने त्यांची नाळ भाजपाशी जोडली गेली. त्यांना नुकताच सातारा जिल्हा युवानोर्चा भाजपाच्या जिल्हाध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे.
चिन्मय कुलकर्णी म्हणाले, सर्वसामान्य घरातून येताना कोणताही राजकीय वारसा नसताना भाजपाने माझी जिल्हाध्यक्ष म्हणून निवड केली याचा खुप अभिमान मला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी नड्डा, राज्याचे नेते देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबरोबर काम करण्याची संधी मला देणारे खासदार उदयनराजे भोसले, आमदार जयकुमार गोरे, खासदार रणजितसिंह निंबाळकर, आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले, महामंत्री विक्रांत पाटील, युवा मोर्चा प्रदेशाध्यक्ष राहुल लोणीकर, भाजपाचे जिल्हाध्यक्ष धैर्यशील कदम, सौ.प्रिया शिंदे, माजी आमदार दिलीप येळगांवकर, मदन भोसले ,अतुल भोसले, नरेंद्र पाटील, मनोज घोरपडे, विक्रम पावसकर, रामकृष्ण वेताळ, सुनील काटकर, शिवाजीराव शिंदे, सोमनाथ भोसले, काका धुमाळ, संग्राम बर्गे, विशाल बागल, अमृत मारणे, सुदर्शन पाटसकर , तेजस गडाळे, सागर शिवदास, विट्ठल बलशेठवार सर्व नेते सरचिटणीस जिल्हा पदाधिकारी मंडल अध्यक्ष यांनी माझ्यावर विश्वास ठेवून निवड केली. त्याबद्दल आभार व्यक्त करतो.